पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वामिनी..

एकत्र राहून सतत खटके उडायचे, म्हणून दादा वहिनी वेगळं राहत होते. दादा भाड्याच्या खोलीत रहायला गेल्यापासून आता जवळपास ५ वर्षे व्हायला आली होती. आणि वेगवेगळे राहिल्यापासून भांडणतंटे कमी होऊन नात्यात गोडवा ही वाढू लागला होता.  सगळं काही सुरळीत सुरू होतं. गेल्या काही वर्षांपासून दादा ज्या आनंदाच्या शोधात होता, तो आनंद आता त्याला खुणावत होता. वहिनीची डिलिव्हरी जवळ आली होती. तेव्हापासून आईवडिलांचं तिकडं येणं जाणं वाढलं होतं. पण घरातल्या सर्व भांडणांना आधीपासूनच मला दोषी धरण्यात आल्यामुळे मी मात्र तिकडे जातच नव्हतो. आईवडिलांच्याकडून दादा वहिनीची ख्यालीखुशाली जाणून घ्यायचो, बस्स इतकंच. शेवटी आपलं माणूस कुठे का असेना, सुखी असेल तर बस्स. आपल्याला आणि काय हवं.?  आणि एकदाचा तो दिवस उजाडला. पहाटे पहाटे पप्पांना दादाचा फोन आला, आणि मी काका झालो. सगळं घर आनंदाने नाचू लागलं होतं. वहिनी आणि बाळं दोघेही सुखरूप होते. पण का कुणास ठाऊक, बाळाला काचेच्या पेटीत ठेवलं होतं. आईवडिलांना आभाळ ठेंगणं झालं होतं. एव्हाना छोट्या मोठ्या कामाने दमणारे आईबाबा दवाखान्यात धाव धाव धावत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर ...

आसू आणि हसू 🎭

आता सारं काही जवळपास संपल्यातच जमा होतं. तरीही का कुणास ठाऊक, पण त्यादिवशीच्या तुझ्या हसण्यामागचं कोडं काही केल्या मला सुटत नव्हतं. त्यादिवशी आपली कोर्टातील ती शेवटची तारीख होती. काही वर्षे का असेना, पण आपण सुखदुःखाचे क्षण एकत्र जगलेले होते. अशा ब-याच कडू गोड क्षणांची मी तिथं उजळणी करत बसलो होतो. त्यावेळी कधी अचानक मला खूप हसू यायचं, तर कधी आतल्या आत माझं मन हंबरडा फोडून रडायचं. पण सहज तुझ्याकडे नजर गेली की, मी‌ सगळं काही विसरून जायचो. आणि तेव्हा वाटायचं की हिला काहीच कसं काय वाटत नाहीये? इतक्या वर्षांचा आपला संसार आज शेवटच्या घटका मोजत असतानाही, ही बाई इतकी निर्विकार आणि हसतमुख कशी काय असू शकते? तो दिवस आणि त्यानंरचे काही दिवस असेच निघून गेले, पण त्या तुझ्या हसण्याचं गूढ मला काही केल्या अजूनही सुटत नव्हतं. आपले नंबर एकमेकांकडे सेव्ह असूनही मध्यंतरी बरीच वर्षे आपलं कसल्याही प्रकारचं बोलणं, वा साधा मेसेज ही नव्हता. तरीही एकदा तरी शेवटचं भेटावं आणि बोलावं म्हणून मी तुला आज इथं भेटायला बोलावलं आहे. मी - (तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत) अगं, कशी आहेस.? ती - (माझ्याकडे न बघताच) कशाला बोलाव...

नियती निमित्त..

एकत्र असा एकदाच प्रवास केला होता आपण, जेव्हा जोडीनं जोतिबाच्या दर्शनाला गेलो होतो. त्यानंतर कित्ती वर्षांनी, नाईलाजाने का असेना, पण आपण दोघे एकत्र प्रवास करत होतो. बसच्या उजव्या बाजूच्या सीटवर मी एकटाच बसलो होतो. तर बसच्या डाव्या बाजूच्या सीटवर तू आणि तुझी आई. बहुतेक नियतीला सुद्धा पुन्हा एकदा,‌ निदान एकदा तरी आपण एकत्र प्रवास करावा, असं मनोमन वाटत असावं. आज निकालाचा दिवस होता. कोर्टातील आज आपली शेवटची तारीख. आपण बहुतेक थोडीफार वर्षे तरी नेटका संसार केलाच. पण हळूहळू अगदी हातातल्या अशा वाटणा-या छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठं स्वरूप धारण करत गेल्या, आणि मग त्या so called नियतीने वगैरे 'होत्याचं' पारं 'नव्हतं' करून टाकलं. बहुतेक टोकाचं पाऊल मीच उचललं होतं, पण माझी बाजू कुणीच कधीच समजून घेतली नव्हती. नेहमीच सगळं काही सावरत सावरत, स्वतःला आवरत मी सांभाळून वाटचाल करत आलो होतो. पण बहुतेक इथंच मी चुकलो. सर्वांनीच मला आणि माझ्या मताला गृहीत धरलं. कोर्टातही ना मला, ना तुला फार काही बोलूच दिलं नाही. फक्त हो किंवा नाही इतकंच बोलायची मुभा होती. बाकी सारं काम वकील लोकांनी थोडं खरं आणि...

शोध सुखाचा...

इथं चुकीला माफी नाही राजा. हे कलियुग आहे. इथं karma अगदी instantly फिरून येतो. मान्य आहे की, आता वेळ निघून गेलेली आहे. पण आई वडील म्हणून आम्ही सुद्धा आयुष्याला पुरलेलो नाही रे. वाईट वाटून घेऊ नकोस, पण एक ना एक दिवस आम्ही सुद्धा अचानक निघून जाऊच.  तेव्हा आमच्या आठवणीत तू असाच कुढत जगणार आहेस काय.? आणि असं आमच्यामुळे, आमच्या काळजाच्या तुकड्याला झालेला त्रास आम्हाला आवडेल काय.? बाळा, आपल्या सगळ्यांचं आयुष्य हे एखाद्या स्टेशन प्रमाणे आहे. जिथं माणूस नावाच्या ट्रेन्स येत जात राहतात. आणि कुठलीही ट्रेन कधीही कायमस्वरूपी मुक्कामासाठी येतच नाही. आज ना उद्या, कधी ना कधी तिला जायचचं असतं. बाळा, येणा-या जाणाऱ्या ट्रेन्सच्या announcement च्या आठवणींच्या गर्दीत हरवलेलं हे स्टेशन, दिवसातला कित्तीतरी वेळ एकटं, रिकामचं असतं रे. म्हणून सांगतेय बाळा, काही गोष्टी जागच्या जागीच सोडून दिलेल्या ब-या असतात. मग त्या गोष्टी आपल्याला सुखावणा-या असतो वा दुखावणा-या.! बाळा, तू म्हणतोस त्याप्रमाणे नसणं वेगळं आणि असून नसणं वेगळं.! पण कधीतरी त्यापुढेही जाऊन विचार कर ना. असण्या नसण्या पलीकडे जाऊन, जे आहे ते जपणं खू...

मांजा

बाळा, आता खूप उशीर झालाय. अगदी महत्वाची आणि मोक्याची वेळही तू कधीच गमावून बसला आहेस. आपल्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देईल असा निर्णय घेत असताना आधी खरंतर दहावेळा विचार करायचा असतो. पण अगदी लहानपणापासून तुझा हा आततायी स्वभाव, तुला आणि पर्यायाने संपूर्ण कुटुंबाला नेहमीच त्रासदायक ठरत आलाय. बाळा, मला मान्य आहे की, तुझ्या मनासारखं कधी घडलच नाही. आणि एक गोष्ट आम्ही घडवायला गेलो तर तिथंही तुझ्या नशीबाने तुला दगा दिला. आता जिथं नशीब आडवं येतं तिथं दोष द्यायचा तरी कुणाला.? आईबाप म्हणून तुझी ही अवस्था आम्हाला पाहवत नाही रे, पतंगाचा मांजा एकदा का हातातून निसटला की तो पतंग दिसेनसा होईपर्यंत आपण त्याला पाहत राहतो, पण इथं आमची अवस्था जरा वेगळीच झाली आहे रे. कारण मांजा तर हातातच आहे, पण पतंग मात्र नजरेला अजिबात दिसतच नाहीये. आणि हातातून मांजा सोडून द्यायची हिंमतही होत नाहीये. तो पतंग तू आहेस बाळा. आणि आता तू नेमका कुणापासून, कुठे पळतो आहेस, ते नेमकं तुझं तुलाही नीट माहीत नाहीये. बाळा, कित्ती जागा बदलणार आहेस.? जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरीही तुझा भूतकाळ आणि त्याच्याशी निगडीत आठवणी तुझा पिच्छा सोडण...