पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाळवी

सुट्टीचा दिवस. मनसोक्त झोप घेऊन, दहा बाराच्या सुमारास आंघोळ, त्यानंतर भरपेट जेवण वगैरे करून, अंगणात खुर्ची टाकून, मी निवांत बसून होतो. बहुतेक दोन वाजायला आले होते. आता संध्याकाळ पर्यंत काय करायचं, हे कोडं पडलं होतं. आजूबाजूला हवेच्या नाजूक झोक्यावर डुलणारी बाभळीची झाडं, चिमण्यांचा चिवचिवाट, काही अंतरावरून वाहत जाणाऱ्या गावच्या त्या नाल्याचा, अगदी सवयीचा झालेला तो उग्र दर्प आणि माझ्या विचारात हरवलेला मी. बाजूलाच ठेवलेला मोबाईल हातात घेऊन, मी सहज त्यातील नोट्स चाळू लागलो. अजूनही कित्ती काय काय लिहायचं अपुरं राहिलं आहे, ते आठवून गेलं, आणि एके ठिकाणी येऊन अचानक माझा हात थांबला. त्याची आठवण आली. आता बरेच दिवस झाले, त्याची माझी भेट झाली नव्हती. आजही सुट्टीचा दिवस त्यामुळे कोर्ट परिसरात भेट घडेलच, याची काही हमी नव्हती. म्हणून मग थेट त्याच्या घरीच जाण्याचा मी निर्णय घेतला. पण तेव्हाच हा विचार ही मनात येऊन गेला की, तो घरात नसलाच तर. पण आता काही केल्या मन ऐकत नव्हतं. थोड्याच वेळात मी त्याच्या घराचा रस्ता धरला. त्यांच घर जवळ येईल तसतसं माझं मन त्याच्या घरात डोकावून पाहत होतं. मागच्या वेळच्या भेटी...

पगार

पगाराचा दिवस जवळ येऊ लागला की, महिनाभरापासून अडगळीत पडलेली बिलं आनंदाने उड्या मारू लागतात. कोप-यावरचा भाजीवाला, दररोजचा दुधवाला ते पेठेतील किराणावाला, या  सगळ्यांच्या आशादायी नजरा, हळूहळू दररोज आपल्यावर रोखल्या जाऊ लागतात. पप्पांचा #पगार झाला की घेऊ, या एका वाक्याने कोंडून ठेवलेली, घरच्या चिमण्यापाखरांची स्वप्नांची फुलपाखरं, मग आनंदाने बागडू लागतात. शेवटी एकदाचा पगाराचा दिवस उजाडतो. पगार देताना नेहमीप्रमाणेच मालकाचा हात आखडताच असतो. कसाबसा एकदाचा पगार हातात पडला की, मग डोक्यात देण्यांचा हिशोब सुरू होतो. आणि संध्याकाळी घरी परतेपर्यत खिसा जवळपास रिकामाच होतो. पुन्हा एकदा चिमणीपाखरं मनात आशा घेऊन कधीच निजून गेलेली असतात. आणि पुढल्या सकाळी, पुन्हा एकदा, पप्पांचा पगार झाला की घेऊ.....🎭 #आयुष्य_वगैरे #अडगळ 💔 #मध्यमवर्ग

मृगजळ

एका प्रेमळ नजरेच्या शोधात सगळं आयुष्य संपून चाललं आहे. दररोजच्या ठरलेल्या साचेबद्ध आयुष्यात, पावलोपावली माझा हा शोध सुरूच असतो. मोजताही येऊ नये, नजरेत बसूही नये, इतक्या माणसांच्या भाऊगर्दीत असूनही, आपलं हक्काचं असं, फक्त एक माणूस आपण निर्माण करू शकलो नाही, कुणाच्या मनात घर करू शकलो नाही, कुणाच्या काळजाचा ठाव घेऊ शकलो नाही, कुणाच्या अधु-या स्वप्नांचा भाग होऊ शकलो नाही, कुणी आपल्याला miss करत नाही, कुणी आपल्या आठवणीत रमत नाही, कुणाची मैफिल आपल्याविना अधुरी नाही, कुणी आपल्याला समजून घेत नाही, आणि आपल्यावर आपल्यासारखंच प्रेम करणारं, आजवर आपल्याला कुणीही भेटलं नाही, आणि बहुतेक कधीच भेटणार ही नाही, अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधाचा हा प्रवास, बहुतेक आपल्या शेवटच्या श्वासाबरोबरच संपणार आहे, ही एक जीवघेणी जाणीव सतत मन कुरतडत असते. आपण नेमकं कुठे कमी पडलो, आपलं नेमकं कुठे काय चुकलं,‌ या प्रश्नांचं धुकं तर, रखरखत्या उन्हात ही मनात नेहमीच दाटलेलं असतं. अशावेळी कधी कधी मनात विचार येऊन जातो की, खरंच.., काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालीच नसती तर किती बरं झालं असतं ना.! किंबहुन...

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे..

आज एक गोष्ट लक्षात आली काय गं तुझ्या.? आज माझा सकाळचा मेसेज तुला पहाटे पहाटे जवळपास साडेचार वाजता आलाय.‌तो आज इतक्या लवकर का आला माहिती आहे. कारण तू स्वप्नात आली होती.‌ काहीतरी बोलायचं आहे म्हणून, मला वाडीवर भेटायला बोलावली होती. तिथं आपण भेटल्यावर... तू - कडू.. हाणला पाहिजे रे तुला. काय झालंय एकदमच. खूप वेगळा वेगळा वागत आहेस, आणि वाटतही आहेस. मी - काय कुठं.! उगाचच काहीतरी विचार करत बसू नकोस. तू - मी खुळी नाहीये, सगळं कळतं मला. तुझं तूच विचार करून बघ. मी - अगं., खरंच तसं काही नाहीये, अगदी नॉर्मलच आहे मी. तू - हेच हेच तर तुझं वागणं खटकते आहे मला. आधी असा नव्हता तू.‌ आधी असं पलटून उत्तर देत नव्हता मला. आणि उगाच मला बोलायला लावू नकोस हं. तुझं काय चुकते आहे ते तुझं तूच कबूल कर पाहू पटकन, नाहीतर हाणते बघ बुक्का..! मी - अगं, आता कसं समजावू तुला. तसं काहीच नाहीये. तू - ऐ, उगाच तापवू नकोस हं मला. मग मार खाशिल ते वेगळं आणि बोलून ही खूप घ्यावं लागेल हं श-या..! मी - हसत हसत, आहाहा... तुझ्या तोंडून माझं नांव ऐकायला कित्ती मस्त वाटतं मला.... तू - कडू.. विषय बदलू नकोस.‌ आता मी काय सांगते ...

एक क्षण पुरे प्रेमाचा..?? 💔

बाळांनो.., सात जन्म साथ देण्याच्या आणाभाका घेऊन, तुम्हाला आता जवळपास सात वर्षे व्हायला आलीत. त्यातही तुमची गेली तीन वर्षेही, कोर्ट कचेरीच्या हेलपाट्यातच गेली आहेत. यादरम्यान कोर्टाने कित्तीतरी वेळा मध्यस्थी केली, तरीही तुमच्यात समेट होत नाहीये. म्हणून अगदी हताश मनाने, एक शेवटचा प्रयत्न म्हणून आज हे कोर्ट तुम्हाला सांगत आहे की, पुन्हा एकदा निदान सात आठवडे तरी तुम्ही दोघांनी एकत्र राहून पहा. झालं गेलं ते गंगेला मिळालं‌ असं समजून, जुनं सारं काही विसरून, एकमेकांच्या वागण्यात काही बदल जाणवतो आहे की नाही, ते पहा. मग आपण पुढील निर्णय घेऊयात. बाळांनो, आम्ही इथं संसार तोडायला बसलेलो नाही आहोत. कित्ती छोटीशी गोष्ट आहे रे. समजून घ्या, विचार करा.! बाहेर व्हरांड्यात थांबून, मी हे सारं काही ऐकत होतो. हे ऐकत असताना लग्न, सात जन्म, आणाभाका हे सगळं काही अगदी गौण वाटत होतं. प्रेमाचा एक क्षणही रागाच्या कित्येक क्षणांना भारी पडतो म्हणे. अशावेळी मग ही जोडपी, एकत्र घालवलेला तो एक प्रेमाचा क्षण, का बरं आठवत नसतील.? कोर्ट म्हणत होतं त्याप्रमाणे, ती छोटीशी गोष्ट नेमकी काय.? या आणि अशा अनेक प्रश्नाच्या वावट...

पार्टनर

हो., मला माहित आहे की तू आता एका मुलाची आई आहेस. पण तरीही इतक्या वर्षात कधीच आपलं जरासं ही बोलणं नसताना, तुझ्या घराच्या वळणावर नेहमीच उभ्या असणा-या, या वेड्याला तू आठवणीत जपलसं, याच मला नेहमीच खूप अप्रूप वाटतं. आणि जेव्हा तुला हे कळालं की, माझ्या आयुष्यात खूपच problems सुरू आहेत, नेमकं तेव्हाच तुझ्या मैत्रीची साथ मला मिळणं, म्हणजे माझ्यासाठी काय आहे, हे तर मी तुला शब्दांत कधीच सांगू शकणार नाही. कारण मला खात्री आहे की, तुला आत्तापर्यंत नक्कीच लक्षात आलं असेल की, तू माझ्यासाठी किती महत्वाची होतीस आणि अजूनही आहेस. तुला हसू येईल कदाचित, आणि मी वेगळी वाट पकडतोय असंही वाटेल, पण त्यादिवशी आपण बालाजी मंदिरात भेटलो ना, तिथं पहिल्यांदाच इतक्या जवळून तुला पाहताना, तुझ्याशी बोलताना, आणि नंतर मंदिरात तुझ्या मागे मागे फिरताना तर आपण सप्तपदी चालतोय, आणि देवाला एक प्रदक्षिणा घातली ना, तेव्हा आपण सात फेरे पुर्ण केले असं समजून तेव्हापासूनच, मी तुला मनापासून माझी बायको मानलं आहे, आणि मनातल्या मनात तुझ्याशी संसार ही सुरू केलाय. खरंतर तेव्हापासूनच तू आणि मी वेगवेगळे राहतोय, असं म...

वेताळ

दुपारची वेळ. नेहमीसारखाच आजही तो अचानक गाठ पडला. चला सर, चहा घेऊयात. असं म्हणून माझ्या हाताला धरून जवळजवळ ओढतच, त्याने मला त्या कोप-यावरच्या टपरीत नेलं. जेवून नुकताच अर्धा पाऊण तास झाला असला, तरी मला वडापाव खायचा मोह आवरता आला नाही. म्हणून मी चहासोबत वडापाव ही घेतलाच. माझ्या बाजूलाच तो नुसता चहा पीत बसला होता. तितक्यात मी त्याला सहज विचारलं की, मग.. आणि काय.? काय म्हणतंय नवीन वर्ष. यंदा काही नवीन संकल्प वगैरे. कसं वाटतं आहे नवीन वर्षात.? हे ऐकून आधी तो भरपूर हसला. थोड्या वेळाने पुन्हा एकदा चहाचा मोठा घोट घेतला, आणि दूरवर टक लावून, कुठेतरी हरवल्यासारखा बोलू लागला. सर, एक सांगू, मराठी नववर्ष असो वा इंग्रजी नववर्ष, तसा आता विषेश काही आनंद वाटत नाही हो.‌ कारण आधीच ही सरूण जाणारी वर्ष, दिवसागणिक आयुष्यातील कित्येक वर्ष खाऊन जातात, आणि त्यात भर म्हणून आपण जिवंत आहोत तोपर्यंत भळभळत रहावी, अशी एखादी जखमही कधी कधी देऊन जातात. सरतेशेवटी शरीराला/मनाला जरी वेदना होत असल्या, तरीही विषेश काही वाईट वाटतच नाही. तशी इथं चूक ही तर सर्वस्वी आपलीच असते म्हणा, कारण आपण आपल्या आजूबाजूच्या इतर सामान्य मा...