पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

३० जुलै, २०२३

नुकताच माझा डोळा लागला होता. तितक्यात मला एका कुत्र्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. हा आवाज ऐकून थोडासा सावध झालेलो मी, हे तर दररोजच आहे, असं म्हणून पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागलो. तितक्यात तो आवाज मला आणखीनच भेसूर व जास्त प्रमाणात ऐकू येऊ लागला. मग मात्र माझ्या मनात भितीची आणि शंकेची पाल एकत्रच चुकचुकली. कारण मी जिथं राहतो, तिथं फारतर फक्त पाळीव कुत्रीच आहेत, भटक्या कुत्र्यांची संख्या फारच कमी, जवळपास नसल्यागतच. पण आज कानावर एकसारखा पडणारा हा भेसूर आवाज वेगळाच वाटत होता. दोन दिवसांपासून रिमझिम पावसाची एकसारखी रिपरिप सुरूच होती. मस्त गारेगार वातावरणात मी उबदार वाकळ घेऊन झोपलो होतो, पण आज या कुत्र्यांनी का कुणास ठाऊक पण एकच कल्लोळ माजवला होता. म्हणून मग नेमकं झालंय तरी काय, ते पाहण्यासाठी मी नाईलाजाने अथरूणातून बाहेर पडलो. अजूनही पावसाची रिपरिप कानावर येतच होती. चुकून घरात शिरलेला आणि कुठंतरी दडून बसलेला रातकिडा त्याची ड्युटी इमानेइतबारे निभावत होता. त्यातच अधेमध्ये एखाद्या बेडकाचा येणारा आवाज तो बेडूक नेमका किती मोठा असेल, या विचाराने हैराण करून जात होता. अंथरूण सोडल्यावर पहिल्या प्रथम...

व्हेंटिलेटर

दोन दिवसांपासून मी व्हेंटिलेटरवर आहे. ते लावलेलं आहे, म्हणूनच मी जिवंत आहे, नाहीतर खेळ खल्लास, असे शब्द अधेमध्ये सतत माझ्या कानावर येत आहेत. मला अॅडमिट केल्यापासून माझी बायको एकदाही हॉस्पिटलमध्ये आलेली नाही. माझा लहान मुलगा एमबीबीएस करतो आहे, तो सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर शिकत असून अद्याप आलेला नाही. मोठी मुलगी तर नांदायला गेल्यापासून आपल्याला एक बाप आहे, हेच विसरून गेली आहे. मी खूप दारू पितो, खूप म्हणजे खूप. आजही घरी बसून मी खूप खूप खूप प्यायलो. तशी दारू आता माझ्या तब्येतीला आणि पर्यायाने जीवनाला घातक असं डॉक्टरांनी ब-याचदा सांगितलंय, पण तरीही मी पितोच. मरण्यासाठी नाही तर जगण्यासाठी पितो. पण आज त्रास जरा जास्तच झाला. माझ्या बडबडण्याचा आवाज ऐकून शेजारचा एक ओळखीचा गृहस्थ घरी आला.‌ आतून कडी होती म्हणून पुर्ण ताकदीने दार ढकलून कडी तोडून तो आत आलाच. तेव्हा मी जमीनीवर निपचित पडलो होतो. माझा श्वास अगदी मंदगतीने सुरू होता. सुसाट रेल्वे स्थानकावर थांबताना कशी आवाज करत हळूहळू थांबते ना, तसं मला वाटतं होतं, बहुतेक सारं काही संपलय आता. हा आपला शेवटचा दिवस आणि बहुतेक शेवटचा श्वास ही जवळ आलाय. त...

पाऊस

पाऊस नुसता पाऊस सगळीकडं पाऊस पडलेला पाऊस पडणारा पाऊस पडतोय पाऊस पडणार पाऊस चिखलातला पाऊस झाडातला पाऊस पानातला पाऊस फुलातला पाऊस खोडातला पाऊस बुंध्यातला पाऊस मुळातला पाऊस मातीतला पाऊस..! पाऊस.. नुसता पाऊस.. पाऊसातला पाऊस पाण्यातला पाऊस चिखलातला पाऊस डबक्यातला पाऊस नदीतला पाऊस नाल्यातला पाऊस ओंजळीतला पाऊस ओघळणारा पाऊस भिजणारा पाऊस भिजवणारा पाऊस ओला चिंब पाऊस..!! पाऊस.. नुसता पाऊस.. घरातला पाऊस छपरावरचा पाऊस कौलातला पाऊस पत्र्यातला पाऊस गळका पाऊस ओलसर पाऊस निसरडा पाऊस खळखळून वाहणाऱ्या पाण्यातला पाऊस हवेतला पाऊस मनातला पाऊस आठवणीतला पाऊस..! पाऊस.. नुसता पाऊस.. शेतातला पाऊस बांधावरचा पाऊस पाटातला पाऊस पीकातला पाऊस चिवचिवणारा पाऊस चोचीतला पाऊस चोच पाऊस ऊडणारा पाऊस थव्यातला पाऊस पंखातला पाऊस पंख पाऊस..!! पाऊस.. नुसता पाऊस.. डोळ्यातला पाऊस झाडाला लटकलेला पाऊस सुन्या कपाळावरचा पाऊस अनाथ पाऊस उघडा पाऊस दुथडी भरून वाहणारा पाऊस कोरडाठक्क पाऊस राजकीय पाऊस जातीय पाऊस रंगांचा पाऊस रंग पाऊस बेरंग पाऊस पाऊस नुसता पाऊस..!!🎭 #आयुष्य...

वचन

कधी कधी ना मी इतका निराश होतो की, काहीच कळत नाही. वाटतं की, बस्सं झालं आता, एकदाचं मोकळं होऊयात वाटतं या सा-यातून. तेव्हा नको नको ते विचार मनात येऊन जातात, तेव्हा आपलं बोलणं जेव्हा नुकतंच सुरू झालं ना, तेव्हा मी तुला दिलेली वचनं मला आठवतात, आणि मग कुठं मन शांत होतं, तेव्हा वाटतं की, निदान आपल्या माणसांसाठी, जो आपल्याला आपलं मानतो त्याच्यासाठी, त्याला दिलेल्या वचनासाठी तरी आपण जगलचं पाहिजे... खूपदा जगण्याला माझ्या मी खूप कंटाळतो.. मग तुझी आठवण येता मरण्याचा विषय टाळतो..!🎭 माझी थोडीशी लिहायची हौस, आणि दररोज श्रावणसरीं सारखा तुझ्या आठवणींचा पाऊस.! हळूहळू हेच जीवन बनत चाललयं. #आयुष्य_वगैरे  #अडगळ #त्याच्या_मनातलं #वचन #गंध_आठवणींचा

aal izz well

दिवसभर सोबत घेऊन फिरलेला हा सगळा मनातला पसारा आहे. घरात लय पसारा झाला की तो आपण आवरतो, घर साफ होत, आणि मी मनात लय पसारा झाला की तो मोबाईलच्या Notes मध्ये उतरवतो, मन हलकं होतं. आईच्या पोटातून बाहेर आल्यावर आपण जे रडतो ना, ते काही उगाच नसतं. ती तर फक्त सुरूवात असते. जन्माला येतो तेव्हा नाव नसतं, आणि जेव्हा आपण मरतो तेव्हा फक्त नावच राहतं. मुळातच आपल्याला माणसाचा जन्म मिळालेला आहे परिक्षा द्यायला, निर्णय घ्यायला. आणि हे सारं करता करता आपली जी काही वाटचाल सुरू असते, त्याला आपण जगणं म्हणतो. चढ उतार येत असतात आणि आपला प्रवास सुरू असतो. आपल्या आयुष्यात एक झालं की एक, एक झालं की एक काही तरी problem सतत सुरू असतात. आपण त्याला कर्माची फळ किंवा भोग म्हणून सोसत असतो. कुणी जिंदादिल त्याला "जीना इसीका नाम है" म्हणून पाठीवर टाकून पुढं जातो, तर कुणी "नकळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते" या भावनेने सदैव त्यासाठी तयार असतो.  एखादी गोष्ट आवडल्यावर लहान मुलं कसं कंटाळा येईपर्यंत त्या वस्तू सोबत खेळत असतं आणि मग मन भरलं, कंटाळा आला की ती गोष्ट टाकून देतं आणि पुन्हा त्...

Time Machine

Time Machine चा अजून जरी शोध लागला नसला आणि Teleportation वर संशोधकांच काम सुरू असलं तरी एक नैसर्गिक Time Travel device तर म्हणता येणार नाही त्याला पण System शब्द शोभेल असं एक Time Travel System ते म्हणजे वास. मग तो घाण असो वा चांगला. (टिप :- मी फक्त चांगल्या वासाबद्दल 😅 बोलतोय.) त्यातल्या त्यात भजी तळताना येणारा आणि  "कांदा-कोथिंबीर-टोमॅटो" यांचा एकत्रित मस्त सुवास जेव्हा येतो ना, तेव्हा तो आपल्याला एका क्षणात किती तरी जुन्या आठवणी आणि ठिकाणांना फिरवून आणतो. यांचं combination म्हटलं की पहिला डोळ्यासमोर येणारा पदार्थ म्हणजे भेळ.! मला तर भेळ तयार होत असताना मधेच हातावर थोडा नुसता कच्चा कांदा आणि कोथिंबीर खायला आवडतं. तोंडापासून पोटापर्यंत सगळीकडे मस्त दवंडी पिटली जाते – थोडं थांबा … भेळ येतेय !! ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करताना, त्यात अधूनमधून पाहिजे त्या प्रमाणात चिंचेची चटणी आणि मिरचीचा ठेचा अथवा लाल तिखट टाकताना, भांड्यात मोठा चमचा वाजवत भेळवाले जो आवाज करतात तो ऐकत रहावा असं वाटतं. तो आवाज अजूनही घुमतोय ना कानात आणि मनात.? मग भेळवाले थोडी भेळ प्लेटमधे घेऊन त्यावर छान पिवळय...

०५ जुलै, २०२३

तुम्ही भोगलेलं शेवटपर्यंत ऐकताना डोळ्यात पाणी आणि हुंदका दाटून आला होता राव.!  खूप वाईट आहे हे सारं..  "बाईची ती वेदना, आणि पुरूषाचं ते रडगाणं" हाच न्याय आहे आजकालच्या समाजाचा. तुम्हाला ऐकत असताना कुठंतरी मी माझ्या एका मित्राला तुमच्यात पाहत होतो. तुमच्या इतके वाईट अनुभव नाही आले त्याला, पण गेली तीन वर्षे कोर्टकचेरी करतोच आहे. साधासुधा किरकोळ मेडिकल problem आहे त्याच्या बायकोचा, तो लपवून ठेवून त्याचं तिच्याशी लग्न केलं. संपूर्ण खर्च घालून तो तिला बरी करतो असं म्हणत असताना, ती व तिच्या माहेरचे तयार नाहीत. तिच्या त्या problem मुळे ती आधीपासूनच खूपच अशक्त आहे, पटपट कामही होत नाहीत. तिचा सदरचा problem त्याला लग्नाच्या दोन वर्षांनंतर समजला, तरीही तो तिला व तिच्या माहेरच्यांना समजून घेऊन, ते सांगतील ते औषधोपचार करत होता, पण काहीच फरक पडत नसल्याने त्याने शस्त्रक्रियेचा हट्ट धरला असता, ती माहेरी जाऊन राहिली आहे आणि त्याच्यावर, त्याच्या संपूर्ण कुटुंबावर आणि लग्नातल्या मध्यस्थांवर कौटुंबिक हिंसाचाराचा फौजदारी खटला दाखल केलाय. कोर्टाने कित्येकदा समुपदेशन करूनही ती नांदायला येत नाहीये. ...

४ जुलै, २०२१

प्रत्येक आवडीला कारण असतंच असं नाही.  कित्येकदा आपण अमुक गोष्ट किंवा तमुक व्यक्ती का आवडते याच काही कारणं सांगू शकत नाही. पण आवडते हे मात्र नक्की. मग बरेचदा प्रश्न पडतो की कारणं काहीच नाही तर मग त्या भावनेला अर्थ काय.? आणि खरंच आपल्याला त्याचं कारण माहित नसतं, आणि कारणांची गरजही नसते.? कधी कधी आपण मनापासून बोललेलं सगळं खरं खरं समोरच्याला खोटं वाटून जातं. आपल्या भावने बद्दल संशय घेतला जातो. तेव्हा आपल्याला वाईट वाटतं. अशा वेळी बुद्धांनी सांगितलेला संदेश आठवतो, ‘फूल आवडतं तेव्हा स्वत:साठी तुम्ही ते तोडून घेता, पण जेव्हा तुमचं फुलावर प्रेम असतं तेव्हा तुम्ही ते तोडत नाही तर त्याची निगा राखता.’ आपली ही भावना आपण सदैव स्मरणात ठेवायची. आणि म्हणूनच प्रेमाचं नाणं वाजवावं लागत नाही. ते वाजतंच! आणि ते वाजलेलं जगाला कळत नाही, पण ज्याला ऐकू यायचं त्याला ऐकू येतंच, अगदी भगवंतासारखंच. आवड म्हणजे प्रेम की प्रेम म्हणजेच आवड.? मग ते काहीही असो. निस्वार्थी मनाने केलेली प्रत्येक गोष्ट अमर असते. ते बंध कायमचे असतात. नेहमी आपल्याला पुढे नेतात, कधीच मागे खेचत नाहीत.! #आयुष्य_वगैरे